phpFaber TopSites 3.5
HooFoo.Net Manage another Free top blog top site for Blogger. Add Your blog to topblog.hoofoo.net and get more traffic to your blog , If you have not blog create it now from Blogs.lk | Blogger | WordPress
Total WebLog listed: 30
50000 Blogger Blog Index And 4000 Wordpress Blog Index
Blogger Blog Index | Wordpress Blog Index |Blog.co.in Index
Main Page | Browse Blog Categories | Top Winners Blog | Join TopBlog | Edit Member Info | Lost Code | Lost Password | FAQ | RSS
A-Blog    B-Blog    C-Blog    D-Blog    E-Blog    F-Blog    G-Blog    H-Blog    I-Blog    J-Blog    K-Blog    L-Blog    M-Blog    N-Blog    O-Blog    P-Blog    Q-Blog    R-Blog    S-Blog    T-Blog   U-Blog  V-Blog    W-Blog    X-Blog    Y-Blog    Z-Blog   
Page-1    Page-2    Page-3    Page-4    Page-5    Page-6    Page-7    Page-8    Page-9    Page-10    Page-11   

कलास्वाद

निरनिराळ्या विषयावरील लेख, कविता आणि स्केचेस यांचे एक अजब मिश्रण करण्याचा एक प्रयत्न !

Faviconविवाहाची पद्यातली आमंत्रण पत्रिका 8 Jul 2008, 2:02 am

तारूण्याच्या उंबरठ्यावर
सुनीत-स्मिताचं स्वप्न
एकमेकांच्या सुखदु:खात
व्हायचंय त्यांना मग्न !
त्यांच्या अशा प्रेमांकुराची
वाढ व्हावी निर्विघ्न ,
म्हणून योजलंय आम्ही चौघांनी
आज त्यांचं लग्न !
दिवस आहे १९ ऑक्टोबर
रविवार आहे सुट्टीचा
मुहुर्त आहे गोरज वेळ
संध्याकाळी सहा चा !
त्यांना द्यायला आशिर्वाद
वेळेवर यायची घ्या दक्षता
एरवी असतात जे रंगीत तांदुळ
तुम्हां हातून होतील अक्षता !
आग्रहाचं हे आमंत्रण
त्याचा न व्हावा अव्हेर
मंगलाष्टकांनी भारुन संध्या
ईडापिडा जाईल बाहेर
तुमचे आमचे संबंध असावेत
जसं मुलीसाठी माहेर
एव्हढं प्रेम सोबत आणा
आणू नका आहेर!
ब्राह्मणांच्या साक्षीनं
वेदमंत्रांच्या घोषात
देव येतील पंगतीला
तुळजा भवानी सह जोशात !
आमच्या घरी येईल सून
पूर्ण करील कुटुंब
"नांदा सौख्य भरे" चे
आशिर्वाद घेऊन तुडुंब !
नवी माणसं नवी नाती
जुळतील नवे संबंध
तुमच्या येण्याने दृढ होतील
आपले सार्‍यांचे ऋणानुबंध !

Faviconरत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर.....एक झलक..... 8 Jul 2008, 2:01 am

बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले !
आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,"बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?"
राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्‍या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्‍हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....."
राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली.....

---------------------------------------------------------------------------------
उदय गंगाधर सप्रे लिखित "रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर" या आगामी पुस्तकातून सप्रेम

Faviconशिवराज्याभिषेक-३३४ वा वर्धापन दिन ! 15 Jun 2008, 11:22 pm



"आज सकाळपासूनच आपला "बा" लंय जोमांत हाय !" असं मनांत येताच बजाबा आपल्या बापाला म्हणजे श्रीपतीला म्हणाला,"आंज लगीन घाई लागलिया जनू बा तुंज्या मांगं?काई इशेस?"
श्रीपती आपल्या कल्ल्यापर्यंत पोचलेल्या आकडेबाज मिशीवर पालथा हात फिरवंत म्हणाला,"आरं , काल बाजारला ग्येलो व्हतो तवाधरंनंच मांजा जीव आबाळायेवढा जांलाय बग !आरं , आपला धनी 'शिवाजी राजा आता दोन रोजांतच आबिषेक करुन घ्येत परत्यक्षात राजा हुनार हाय' अशी खबंर दिली बग सवता हंबीरमामा मोहित्यानं मला ! आन् त्ये आईकल्यापासनं मांजं काळीज सुपायेवढं जांलया बग ! त्याच नांदात लय झ्वोकात चालंत आलू रं मर्दा म्यां बाजारातून घरापत्तूर !"
बजाबाला आपल्या म्हातार्‍या बापाचं हसू आलं.जिवा-शिवा या खिल्लारी बैलाची जोडी असलेली बैलगाडी घेऊन बाजाराला गेलेला आपला 'बा' "चालत आलू रं!" म्हणतोय म्हणजे हसायचं नाहीतर काय?

बजाबाला आपल्या बापाची थट्टा करायची लहर आली.तो म्हणाला,"बा, पाय लय दुखलं आस्त्याल न्हाई बैलगाडीतल्या गाडीत चालून्?"आणि आपल्याच या कोटीवर तो गडगडाट करत हसू लागला.त्याचं ते हसणं ऐकून त्याची बायको जनी आणि लेक रखमा परसातून धावत माजघरात आली.त्या दोघींकडे बजाबाचं लक्ष जाईपर्यंत जनी श्रीपतीजवळ वाकली होती आणि गुढग्यात डोकं खुपसून हमसून हमसून रडणार्‍या आपल्या सासर्‍याला म्हणाली,"मामंजी, पर म्यां म्हनीते, आंदी आपली प्वारं जिवा-शिवा इकलासा आन् आता टिपं गाळतासा ! ह्ये समदं कशापायी वं?"
बजाबाचं हसणं गपकन थांबलं.जनीचं बोलणं-बापाचं तोंड खुपसून हमसून रडणं याचा अर्थ त्याच्या रांगड्या टक्कुर्‍यात शिरेपर्यंत काळच जणू थांबला होता. पण जिवा-शिवा या बैलजोडीला विकलं हे विदारक सत्य समजताच बजाबा चवताळ्ला आणि गुरकावत बापाला म्हणाला,"आरं मांज्या द्येवा,ही काय अवदसां आटिवली म्हनायची रं बा तुला? तुला काय कमी पडलं रं म्हून तू ....." आणि मग बजाबानं जीभ चावली.त्याच्या लक्षात आलं की आपली आई त्या आदिलशहाच्या कुण्या एका सरदारानं उचलून नेली, नासवली आणि त्या दु:खाने तिने जीव दिला. नंतर आपल्या याच बापानं रात्रंदिवस मेहेनत करून्,शेती करून आपल्याला वाढवले.जातीचा रामोशी असला तरी श्रीपती शेतकरी होता.त्यामुळे तसंच काहिसं कारण असल्याशिवाय आपला बा असं काही करणार नाही अशी कुठेतरी जाणीव त्याच्या मनाला झाली.कानकोंडं होत तो बापाकडे पाहू लागला.

आपल्या पैरणीच्या बाहीला डोळे पुसून घशातला कढ आवरत श्रीपती म्हणाला,"प्वारांनू,आरं म्यां बी शेतकरीच हाय् न्हवं? शेतकर्‍याला बैल म्हंजी ल्येकरापरीस पिरतीचं ह्ये काय म्यां सांगाया हुवं व्हंय रं तुमास्नी?आरं पर म्यां जिवा-शिवा इकले त्ये मांज्या सुकासाटी न्हाय रं मांज्या ल्येकरांनू! परत्यक्ष आपला धनी -शिवाजी म्हाराज -आता दोन रोजांनी तख्तावर बसनार -त्येला समदी बामनं पुंजापाट करनार - आबिष्येक करनार. म्हंजी ह्ये अक्षी घरचंच कार्य व्हनार म्हना की ! तर् त्यापाई गावच्या पाटलानं गावगन्ना-सिंहासनपट्टी गोळा केलिया.दो मासां आंदी गावच्या त्या म्हादेवाच्या मंदिरात राजाचं पत्तुर आल्येलं पुजार्‍या जोश्यानं वाचून दावलं हुतं.आता तुमी तिंगंबी कालच सूनबाईच्या घरनं तिच्या भावाचं लगीन आटपून आलासा,तवा म्या म्हातार्‍याच्या काय बी टक्कुर्‍यात र्‍हायनां ह्ये बोलायाचं.बरं त्ये आसू जाऊ-म्या ग्येलं दो मास पैका साटवन्याची लई कोशिस क्येली रं पर जमनां ! मंग विलाजच हरला रं सोन्यांनू मांजा आन् काळजाचं त्ये द्वान तुकडं काल बाजरला इकून आलू जालं!"

आपल्या बापाचं हे बोलणं ऐकलं मात्र , आणि बजाबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.तो एकदम चवताळून जात ओरडला,"म्हंजी कालचा पातशहा हुता त्येच्यापरीस ह्यो रांजा जुलमाचा जाला की रं बा! पर म्या म्हनतो, ह्ये आपल्या परजेला आसं नागवं करून तख्तावर कशापाई बसनार हाय रं ह्यो?ह्येच्यापरीस त्यो आदिलशहा पातशहा बरा रं - तख्ती बसनार म्हून वसुली तर करत न्हाई ! आन् ,.." याहीपुढे बोलण्यासाठी तोंडपट्टा चालू असलेल्या बजाबाच्या डोळ्यांपुढे एकदम काजवे चमकले.साठीच्या पुढचा श्रीपती - आपला बा बसल्या जागेवरून उठून आपल्या पुढ्यात आला कधी आणि त्याने आपल्या म्हातार्‍या पण कमावलेल्या शरीराच्या हातांनी फाडकन आपल्या कानाखाली आवाज काढला कधी हे समजेपर्यंत श्रीपतीची आणखीन एक चपराक त्याच्या दुसर्‍या कानाखाली बसली आणि तरणाबांड बजाबा खाली कोलमडला.चार वर्षांची चिमुरडी रखमा भोकाड पसरून रडू लागली.बायको जनी बजाबाला सावरायला पुढे झाली व करवादंत म्हणाली,"अवं बाबा , पर म्या म्हनीते काय चुकलं वं ह्येंचंबी?रीन काडून सन करनारा असा राजा हुवाच कुनाला?" आणि तिनं बजाबाला बसतं केलं.

आता मात्र श्रीपतीला रहावलं नाही.आपल्या दोन हातांनी आपले कान झाकत तो जमिनीवर फतकल मारून बसला आणि म्हणाला,"ह्ये आसलं वंगाळ मांज्या द्येवाबदल - राजाबद्दल आईकन्यापरीस मांजं डोळं का मिटलं न्हाईस रं द्येवा?आरं प्वारा-- सून बाई , या या बजाबाची माय - तिनं जीव दिला तवाधरनं म्या याला माय आन् बाप व्हंत सांबाळला,कंदी नक बी न्हाय लावलं त्येला , त्ये हात आंज उटलं मांजं ! का?म्हाईत हाये?न्हाई ना?मंग आईका तर-, ये रकमे ये, मांजी शानी बाय ती!" असं म्हणंत श्रीपतीने रखमेला जवळ घेतले , तिच डोळे पुसले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तो बोलू लागला,"या चिमन्येयेवडाच व्हता गं तुजा ह्यो धगड्.त्येची माय जीव दिऊन सुटली आन् म्यां अडाकलो.आता काय करावं हा सवाल टक्कुरं फिरवंत व्हता.त्या लांड्या सरदारास्नी इरोद क्येला म्हून रांडंच्यांनी घरदार जाळलं.माज्या शिरपा बैल आन् यशवंती गाईला गोठ्यात जाळलं.घरादाराचा इस्कोट क्येला.म्या तवा पार इसकटलो व्हतो आन् श्येजारच्या आबा द्येशमुकानं सांगितल्यापर्मानं पुनवडीला त्या माऊलीकडं ग्येलो व्हतो.तवा म्या काय बी सांगायच्या आंदीच येका तरन्याबांड प्वारानं-या या बजाबाच्या आताच्या उमरीचाच आसंल बंग त्यो-शिवाजी राजा-त्येनं मांज्या हातात मला आन् ह्येला आशी कापडं दिल्ली आन् सवताच्या श्येजारी बसवून ठिवत मला चटनी भाकार भरवली रं प्वारांनू ! नरड्यांतून घास जाईना रं मांज्या त्यांचं त्ये पिरेम बंगून्.जीव पार घुसमाटला.म्या त्येच्या पायावर घालून घ्याया ग्येलो तं त्येनंच मांजं पाय धरलं रं प्वारांनू आन् म्हनला,"बाबा, आमच्या आया-बहिणींची अब्रू रक्षण करण्याचं व्रत आम्ही घेतलंय.पण अजून म्हणावं तेव्हढं धन्,शस्त्र काहीच आमच्याकडे नाही.त्यामुळे तुमच्या बजाबाच्या आईला आम्ही वाचवू शकलो नाही, म्हणून आम्हीच तुमची माफी मागतो.पण आई भवानीची आम्हांस आण असे बाबा, पुन्हा कुअट्।अल्या बजाबाला पोरकं होऊन द्यायची वेळ येऊन देऊ नयी म्हणून आमचं व्रत आचरण्याचं बळ आम्हांस येण्याचा आशिर्वाद आम्हांस द्या !"

आणि त्या दिवशी रं ल्येकरांनू , रिता गेलेला म्यां रामोशी शेती - घर यापाई थैली अन् पांच सालाची शेतसारा माफी घिऊन भरल्या हातानं परतलू ! आन् त्यो राजा नी त्येची ती जिजाऊ माय कंदी आपलं बैल इकून पैकं मांगल आपल्याकडं आसं कसं रं वाटलं मुर्दाडा तुला?आरं आपल्या कातड्याचं पायतान क्येलं ना तरीबी ह्ये रीन न्हाई रं फिटनार त्येंचं ! त्या मांज्या राजा शिवाजीसाटी म्या बैल इकलं आन् ह्ये धन म्यां सवता द्येनार त्येला न्हिऊन त्या रायगडावं !"

आपल्या बापाचं हे बोलणं ऐकून बजाबा गहिवरला.पण तरी आपण आता शेती कशी करायची?ही शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकत होती.म्हणून भरल्या गळ्यानं तो म्हणाला,"बा, म्यां चुकलो रं ! तुंजं आबाळायेवढं काळीज वळीकलंच न्हांय रं म्यां ! पर बा, शेतकर्‍यानं बैल इकून शेती कशी रं करावी आन् मंग काय खावं रं प्वाटाला?"

आता श्रीपतीला जरा हुरूप आला व तो म्हणाला, "आरं मर्दा, ह्यो तुंज्या रुपानं वहागावानी मांजा ल्योक असल्यावर खायाची चिंता रं कुनाला? आरं त्या राजाचा शिपाय म्हून र्‍हा की तु तथंच रायगडावं त्येच्यापाशी ! आन् म्या बी बगंन काय वरकड काम न्हाय तं जनावरं राखन्याचं काय बाय काम. आरं राजाचं हात मजबूत व्हाया हौवेत रं मर्दा ! उंद्याच्याला रामपार्‍यात आपून समदी जावू रायगडावं आन् राजाला ह्ये आपलं धन द्येवू , त्या माय च्या पायावं सून बाय नी ह्या चिमन्या रकमेला घालून घ्येवू."

आपल्याला आपला राजा बघायला मिळणार म्हणून घटकेपुर्वी रडणारी रखमा आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून खुदुखुदु हसू लागली आणि जनी पण हे बघून सुखावली.आपल्या राजासाठी सर्वस्व लुटून देवून समाधानाने हसणार्‍या त्या घरात तिन्ही सांजेला लक्ष्मी प्रसन्न होत प्रवेशत होती.

श्रीपती आणि बजाबा या सारख्या अनेक गरीब सामान्य बापलेकांना हा राजा आणि हे राज्य आपले आहे असेच वाटले आणि यातच आपल्या या राजाचं महत्व दिसून येते.

राज्याभिषेकाची आवश्यकता

लहानपणापासून शिवरायांनी सामान्य माणसांवरील अन्यायाच्या विरुध्द दंड थोपटले.१६४५ ते १६७४ या ३० वर्षांच्या काळात त्यांना अनेकदा असा अनुभव आला की लोक आपल्याला 'एक बंडखोर सरदार' किंवा 'पुंड-पाळेगार' समजतात.हा असा त्यांचा समज दृढ होण्याची अनेक कारणे होती .त्यातील काही ठळक कारणे व प्रसंग पुढीलप्रमाणे :

१. रांझ्याच्या पाटलाचा न्यायनिवाडा

सामान्य कुणब्याच्या पोरीवर रांझे गावच्या पाटलाने बलात्कार केला.नंतर जननिंदेस घाबरून त्या मुलीने आत्महत्या केली. ही गोष्ट समजताच पाटलाला हजर व्हायला शिवरायांनी आपल्या माणसांकरवी निरोप पाठवला.तेंव्हा तो म्हणाला, "तुमच्या त्या शिवाजीला जाऊन सांगा, तू नावाचा राजा आहेस्-तसा मी कुणी नावाचा पाटील नाही, या गावाचा अधिकारी पाटील आहे.मी या प्रजेला माझी बटीक समजतो." यानंतर त्याला मुसक्या बांधून शिवरायांसमोर हजर करण्यात आले व शिवरायांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा फर्मावली.तेंव्हा पाटील तिथे हजर असलेल्या दादोजी कोंडदेवांना म्हणाला,"पंत, गोतमुखाने न्याय व्हावा!"
त्याच्या या म्हणण्याचा अर्थ शिवरायांच्या मनात घर करून राहिला की,' न्याय करण्याचा अधिकार राजाचा, वरीष्ष्ठ वर्णियांचा-ब्राह्मणांचा किंवा जात/गोत पंचायतीचा.शिवाजी राजा नाही,तो वरीष्ठ वर्णाचा नाही म्हणून त्याला न्याय्निवाडा करण्याचा अधिकार नाही.'

२. जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांचा जबाब

जावळीच्या भौगोलीक महत्वामुळे चंद्रराव मोर्‍यांना आपण जावळीचे अभिषिक्त राजे व सम्राट असल्याचा दंभ निर्माण झाला.त्यावेळी शिवरायांनी त्यांना लिहिलेल्या पत्राला चंद्ररावाने दिलेला जबाब पण शिवरायांच्या मनात घर करून राहिला.चंद्ररावांनी लिहिले होते,

" चंद्रराव ही आमची खिताब ! आम्ही पिढीजात राजे ! तुम्ही काल राजे जाहाला.तुम्हासं राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हंटलियावरी कोण मानितो? येता जावली - जाता गोवली.पुढे येक मनुष्य जिवंत जाणार नाही.तुम्हांमधे पुरुषार्थ असला तर उदईक येणार तर आजच यावे.आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महबळेश्वर ! त्याचे कृपेने राज्य करीतो.आम्हांस श्री चे कृपेने पातशहाने राजे खिताब मोरचेल सिंहासन मेहेरबान होऊन दिधले.आम्ही दाईमदारी दर पिढी राज्य जावळीचे करीतो.तुम्ही आम्हांसी खटपट कराल तर तो अपाय होईल.यश न येता अपयशास पात्र होऊन जाल !'

वास्तविक जावळी भागातील आदिलशहाचा सुभेदार दौलतराव - ज्याच्या घराण्याला "चंद्रराव" किताब होता-तो निपुत्रीक मरण पावल्यावर त्याची विधवा बायको आणि आई माणकाई ह्यांच्या सांगण्यावरून शिवरायांनीच शिवथरच्या यशवंतरावांना त्यांच्या कॄष्णाजी,बाजी या दोन मुलांसहीत व मोहना या मुलीसह दत्तक घेवून नवीन चंद्रराव गादीवर आणला होता हेतू हा की, जावळीसारखा दुर्गम भाग वेळप्रसंगी चंद्ररावासह स्वराज्याच्या पाठीशी राहील.पण प्रत्यक्ष आपणास "राजे"पद देणार्‍यास हे आपलेच लोक राजे मानत नाहित असा जीवघेणा कटू अनुभव शिवरायांना आला.

३. एकदा वाड्यावर काही खास प्रसंगानिमित्त शिवरायांनी मानकरी व सरदार यांना आमंत्रणे दिली होती.भोजन समारंभाच्या वेळी शिवरायांसाठी मोठा चौरंग ठेवून त्यावर गादी घातली.दुतर्फा बाकिच्या मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था केली गेली.त्या समारंभास आलेल्या मंडळींमधे मोहिते, महाडीक,शिर्के,निंबाळकर, घाडगे,जाधव आदी सरदार होते.महाराजांसाठी केले उच्चासन पाहून त्यांना विषाद वाटला व त्यापैकी काहीजण म्हणू लागले की,"शिवाजीमहाराजांकडी आता थोरपणा आला काय? आम्ही कदीम, तालेवार सरदार, आम्ही मोरचेलाचे अधिकारी्यांच्या वडिलांस हा अधिकार कधिही प्राप्त झाला नव्हता.असे असता आमची मानहानी करून हे उच्च स्थानी बसणार व आम्ही त्यांच्याजवळ खाली बसणार , हे आम्हांस कमीपणा आणणारे आहे.अशी अमर्यादा करून घेण्यापेक्षा ह्या सदरेस आम्ही बसूच नये हे उत्तम !" असे बोलून ते उठून चालू लागले.तेंव्हा कारभार्‍यांनी त्यांची समजूत घालून प्रत्यक्ष महाराजांशीच बोलण्याचा सल्ला दिला व महाराजांच्या पंगतीचा अवमान न करण्याची विनंती केली.महराजांच्या कानावर हा प्रकार जाताच महाराजांनी त्यातील बहुसंख्य मराठा सरदारांची "ना हरकत" मान्यता घेतलींअंतर घोरपडे, निंबाळकर यांसारख्या मानाच्या सरदारांना एकांती बोलावून त्यांची मर्जी विचारली.त्यावर त्या मानी सरदारांनी असा जबाब दिला की,"आम्ही यवन पादशहांचे पुरातन नोकर्.च्हारपाचशे वर्षांचे जुने सरदार.आम्हाला ही अमर्यादा सहन होणार नाही! तरी याचा विचार तुम्हीच करावा!"यावर महाराजांनी म्हटले,"ज्यांस आपल्या प्रतिष्ठितपणाचा येव्हढा अभिमान वाटत असेल, त्यांनी आमच्या सदरेस येवू नये.कारण पडेल त्यावेळी त्यांस बोलावून आणू.उगाच बखेडा माजविण्याचे कारण नाही.ज्यांस ही व्यवस्था रुचत नसेल त्यांस आम्ही निरोपाचे विडे देवू !" यानंतर ती सदर बरखास्त झाली.

ह्या प्रसंगावरून शिवरायांच्या लक्षात येऊन चुकले की आपल्या पदरच्या मराठे सरदारांना पण आपल्याविषयी विशेष मान्यताबुध्दी नाही.याचे कारण - जुलमी राजवट असली तरी यवन हे अभिस्।इक्त पातशहा आहेत आणि स्वराज्य स्थापन करूनही आपण अभिषिक्त राजे नाही !

४. 'आपल्या या काळात विदेशी यवनांनी आपला देश जुलूम जबरदस्तीने पादाक्रांत केला असून मोंगल , इराणी, तुराणी व पठाण स्वतःला वंशाने व धर्माने उच्च मानतात आणि आपल्या देशातील मुसलमानांनाच तुच्छ मानतात तिथे आपल्या हिंदूंची अवस्था विचारायलाच नको !' ही खंत विचार शिवारायांच्या मनांत वर्षानुवर्षे खदखदत होती!

या सगळ्यांत 'बळी तो कान पिळी' या न्यायाने राज्यकर्ता स्रेष्ठ होता ! त्याने सरंजामदार्-पाटील्-कुलकर्णी-वतनदार्-देशमुख्-जहागिरदार असे आपले हस्तक ठेवावेत - त्यांनी त्या त्या राजाच्या नावावर वसूली करावी , अवाच्या सवा कर वसूल करून वर प्रजेचा अमानुष छळ करावा व राजाला हिस्सा नेवून द्यावा.त्यामुळे सामान्य जनता गरीब माणूस भरडला जात असे.मग तो कोणत्या का धर्माचा वा जातीचा असेना ! "हे थांबवायचे असेल तर आधी ही पाटीलकी-वतनदारी ही मोडून काढतआपलं सामान्य माणसाला दिलासा देणारं सुराज्य-स्वराज्य निर्माण व्हायला हवं "हे शिवरायांनी आपलं ध्येय बनवलं !

मुसलमान राज्यांमधे धर्मसत्ता व राज्यसत्ता एकच आहे परंतू हिंदू राज्यात मात्र राजसत्तेला धर्मशास्त्राचा पाठिंबा मिळणे आवष्यक आहे याची जाणीव शिवरायांना झाली.

वरील कारणांमुळे तसेच "बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात गुप्त घराण्यानंतर हिंदू राजा - शासक मिळाला नव्हता.त्यामुळे हिंदू धर्म सर्रास लयास चालला आहे - तेंव्हा आता धर्मदंडास राजदंडाचं पाठबळ आणि धर्मदंडाच्या बैठकीवर राजदंड प्रस्थापित करणं आवश्यक असल्याचं " उत्तरेतील विश्वेश्वर भट्ट ऊर्फ गागाभट्ट या विद्वान ब्रह्माणाने प्रतिपादन केल्यामुळे , सामान्य जनतेलाही आपल्या या राज्यासाठी आपला राजा असावा अशी प्रबळ इच्छा झाली आणि आपल्या पश्चात् पण आपली रयत सुराज्यात नांदण्यासाठी शिवराय अभिषिक्त राजे झाले !

शिवराज्याभिषेकाचं महत्व व दुरोगामी परिणाम

१. मराठी सत्तेला अधिष्ठान प्राप्त झाले.सिंहासनाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची प्रेरणा व चुरस समस्त मर्‍हाठी जनतेत निर्माण झाली !

२. आता केवळ शिवाजीच्या मृत्यूमुळे यवन सत्ताधीश यांच्या सत्तांपुढे निर्माण झालेले आव्हान विरून जाणे अशक्य झाले.त्यासाठी या सिंहासनावर अधिकार सांगणार्‍या हर एक वंशजाला समूळ नष्ट करणे वा शरण आणणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक झाले.यामुळे सर्वात मोठा हादरा धर्मवेड्या औरंगझेबाला बसला - कारण त्याचे हिंदुस्थानचे इस्लामीकरण करण्याच्या महत्वाकांक्षेला अडसर निर्माण झाला.

३. करारनामे, करवसुली, कर लागू करणे , न्यायदान करणे, शिक्षा करणे , कुठल्याही जातीच्या माणसाला -विशेषतः त्यावेळी उच्च समजल्या जाणार्‍या ब्राह्मणांना शिक्षा वा दंड देणे या सार्‍यांना एक संवैधानिकता प्राप्त झाली.

४. प्रचलित भाषेमधे-प्राकृत मराठी भाषेमधे राज्यव्यवहार सुरू झाला.फारसी भाषा जी सर्वसामान्य माणसांना अवगत नसे ती जाऊन मराठीत व्यवहार सुरू झाला.

शालिवाहन राजाने आपल्या नावाने शक सुरू केला.पण या आमच्या राजाने स्वतःच्या नावाने शक चालू न करता "राज्याभिषेक शक" चालू करून जणू यवनांना व जुलमी माणसांना जी घटना कायम धसका देईल अशा ३०० वर्षांनंतर झालेल्या घटनेला स्वतःपेक्षा जास्त महत्व दिले.

५. राज्याभिषेकामुळे यवन राज्यकर्त्यांव्यतिरिक्त इतर प्रदेशी व्यापारी-डच्-फ्रेंच्-पोर्तुगीज्-इंग्रज- ज्यांनी व्यापाराचं निमित्त करून हिंदुस्थानात प्रवेश मिळवून हातपाय पसरण्याचे प्रयत्न सुरू केले होते त्या सर्वांवर एक वचक निर्माण झाला.

ज्या दिवशी शिवराय छत्रपती झाले तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी ! महाराज बत्तीस मणाच्या अष्टकोनी सुवर्णसिंहासनास पाय न लावता त्यावर आरुढ झाले.महाराज छत्रपती झाले-राजे झाले.राजा म्हणजे नृपती-म्हणजे पृथ्वीचा पती, प्रजेचा पिता-सारी प्रजा त्याची लेकरें !

महाराज आपल्या अभिषिक्त राणी सोयराबाई व युवराज संभाजी यांच्यासह जिजाऊंना नमस्कार करण्यासाठी स्वर्गीय काशीबाई राणीसाहेबांच्या महाली आले.काशीबाईंचा स्वर्गवास झाल्यापासून जिजाऊ माँसाहेब त्यांच्याच महाली राहिल्या होत्या.

जिजाऊ माँसाहेब आता थकल्या होत्यां. नजर पण कमजोर झाली होती.तरी पण श्रवणेंद्रियांना यशवंत, कीर्तीवंत, छत्रपती राजाच्या दमदार पावलांची चाहूल लागलीच ! गुढग्यांना हातांचा आधार देत माँसाहेब उभ्या राहिल्या.मस्तकी सुवर्णाचा मुकुट धारण केलेले राजे जवळ येत चालले आणि पाऊणशे वर्षे वयोमान उलटून गेलेल्या डोळ्यांना धारा लागल्या.समोरचे दृष्य धूसर होत चालले.कानांना दमदार चाहूल लागताच ती माऊली कंबरेत वाकली.शिवरायांना मुजरा करत ती वात्सल्यमूर्ती म्हणाली,"छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा !"

राजांच्या घशातून आवंढा आला.घोगर्‍या स्वरात ते म्हणाले,"माँसाहेब ! आमचा काय अपराध झाला म्हणून आपण आम्हांस असं....." त्यांच्यानं पुढे बोलवेना.ते मटकन खाली बसले.त्यांच्या पाझरणार्‍या डोळ्यांतील ऊष्ण अश्रूंनी जिजाऊंची पावले भिजली.त्यांनी भरल्या डोळ्यांनी धुरकट दिसणार्‍या राजांच्या खांद्यांना धरत त्यांना उठायची खूण केली.राजे उठता उठता त्या म्हणाल्या,"स्वराज्याच्या छत्रपतींना असं कमजोर होऊन कसं चालेल?राजे उठा, तुमची काहीही चूक झालेली नाही.उलट याचसाठी केला होता हा अट्टाहास ! स्वारी आम्हांस म्हणाली होती,"आम्ही कर्नाटकांत संभाजीस मोठ्ठा करू तुम्ही मर्‍हाट राज्यात शिऊबांना मोठ्ठे करा ! बघुया कोण जास्त कीर्तीवंत होतो - जो जास्त कीर्तीवंत होईल त्याचा पालन्कर्ता जिंकला असे समजू ! पण राणी सरकार, रणांगणातच नव्हे तर कधीही हार न आवडणार्‍या आम्हांस याबाबतीत मात्र आमची हारच होईल असे दिसते आहे आणि ही हार मात्र आम्हांस खचितच आवडेल !"
संभाजी कीर्तीवंत होत निघून गेला-स्वारी गेली- आम्ही या आमच्या बोडक्या कपाळानिशी तुमची मिठी सोडवली नाही म्हणून मागे राहिलो ते येकाच स्वप्नापायी ! आमच्या या मर्‍हाट राज्यात उघड्या नागड्या फिरणार्‍या कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस अनाथ होऊ नये-त्याला हकाचा पिता-हकाचं छत्र-छत्रपती मिळावा-ते आम्ही पहावं-स्वारींचं अधुरं स्वप्नं आमच्या डोळ्यांनी पूर्ण होताना बघावं म्हणून ! लेकरा, या स्वराज्यासाठी तुझं पुत्रदान केलं आम्ही ! ते स्वप्न तू आज पुरं केलंस ! आम्ही आमच्या लेकींचा पती पृथ्वीच्या पोटात घातला - तेंव्हाच आमचा माँसाहेब हा अधिकार संपला.तुम्ही तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रच ! तुम्ही कधीही उणं-दुणं वागला नाहीत.आमची रिती ओटी आज भरभरून वाहिली , आपल्या आई-बापाचं स्वप्नं तुम्ही आज पूर्ण केलंत! आज आमचा पुनर्जन्म झाला राजे ! आज तुम्ही प्रजेचे पिता झालात आणि आम्ही पण तुमचे प्रजारुपी लेकरू झालो आणि म्हणून या स्वराज्याची स्वप्नं बघणार्‍या या वेडीनं तो तुम्हांस मुजरा केला !

सारा देश यवनांनी पादाक्रांत केला असताना आपल्या सामान्य जनतेसाठी सामान्य जनतेचं राज्य - स्वराज्य यावं याची स्वप्नं बघत स्वारींनी केलेले इजा-बिजा-तिजा - तीन प्रयत्न फसले.पण तुम्ही ते स्वप्नं पूर्ण केलंत ! आज या त्रिभुवनांत आमच्याएव्हढं कुणी श्रीमंत नसेल राजे ! प्रत्येक कठीण प्रसंगी जीव मुठीत घेवून जिद्दीनं उभ्या राहिलो आम्ही, राजे केवळ या क्षणासाठी की तुम्हांस सांगावं 'स्त्री ही क्षणिक काळची पत्नी आणि काळची माता असते ह्याहीपेक्षा एक त्रिकालबाधित सत्य आहे आणि ते म्हणजे छत्रपती हा क्षणिक काळचा सुध्दा स्वतःचा रहात नाही ! तो फक्त प्रजेचा पिता असतो - अनादी अनंत काळापर्यंत !गागाभट्टांनी आमच्या येका गोमट्या मुलांस अभिषेक केला आणि अशा छत्रपतींनी आपल्या नि:स्पृह अश्रूंनी आमच्या चरणांस अभिषेक केला ! आम्ही धन्य झालो राजे, आज हे प्राण तुम्हावरून अखेरचे ओवाळून टाकत आहोत ! स्वतंत्र म्र्‍हाट राज्याच्या स्वराज्याच्या या छत्रपतींना आमचा मानाचा मुजरा !"

......आणि जिजाऊंनी आपले हे अखेरचे शब्दही खरे केले.राज्याभिषेकापासुन बरोब्बर १३ व्या दिवशी - १८ जून १६७४ रोजी चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजत राहिलेल्या जिजाऊ माँसाहेब स्वर्गवासी झाल्या !

माँसाहेब, 'स्वराज्याचा छत्रपती घडवीन' या तुमच्या जिद्दीस एक मुजरा तर त्या स्वप्नपूर्तीनंतर इच्छामरणाने आम्हास सोडून जाण्याच्या तुमच्या अखेरच्या जिद्दीस आमचा त्रिवार मुजरा ! आणि 'याची देही याची डोळां' आपल्या मातेस कुबेराहूनही श्रीमंत करणार्‍या आमच्या छत्रपतींना आमचा आमरण मानाचा मुजरा !

जय भवानी ! जय भारत !

------------------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे---------------------------------१६-जून्-२००८-वेळ ००.१६ वा.----------------------------------

आपण आम्हांस इथेही भेटू शकता :

कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ [1]

आणि

कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/ [2]

()

Faviconशिवराज्याभिषेक-३३४ वा वर्धापन दिन ! 15 Jun 2008, 11:18 pm

()

Faviconऔरंगझेब - एक बरबादशहा ! 23 Apr 2008, 5:23 am

लोकसत्ता-रविवार दिनांक ०७-जानेवारी'०७ : मुखपृष्ठावरील बातमी :
"औरंगजेबाच्या मॄत्यूला फेब्रुवारीत ३०० वर्षे पूर्ण - भूषण देशमुख-नगर"

वरील लेख वाचनात आला आणि मन विषण्ण झाले ! लोकसत्ता सारख्या प्रथितयश वॄत्तपत्राने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला ! मी सतत ३ आठवडे अगदी दिवस रात्र एक करून संशोधन करून काही लिहिले ते पुढे मांडत आहे.प्रत्येक माणसाला आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे , त्यामुळे सदरचा लेख हा कुणावरही टीका अथवा कुठल्याही जाती ध्र्माबध्दल अनास्था दाखविण्यासाठी लिहिलेला नाही हे मायबांप वाचकांनी लक्षात घ्यावे अशी कळकळीची "सप्रे"म विनंती !--------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे--------------------------

औरंगझेब - एक बरबादशहा !

१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या !
त्यांची ४०९ वी जयंती असा लेख काही लोकसत्ता मधे वाचायला जास्त आवडले असते !

ज्या औरंगझेबाच्या कबरीच्या फोटोसकट पहिल्या पानावर बातमी दिली गेली , त्या औरंगझेब बध्दल मायबाप वाचकांना अधिक माहिती मिळावी यासाठी हा सर्व ऊहा पोह ! हा लेख मी लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही !

ज्या तैमूरलंगाचे आपण वंशज आहोत असा औरंगझेबाला अभिमान होता, त्या तैमूरलंगा पासूनच आपण सुरुवात करुया.

मानव संहारात (हिडीस) आनंद मानणारा मध्य आशियातील एक संस्कारहीन तुर्क लुटारू म्हणजे तैमूरलंग ! युध्दात पकडलेल्या लोकांची मुंडकी तोडून त्यांचे मनोरे रचण्यात आनंद मानणारा हिडीस मनोवृत्तीचा एक नराधम म्हणजे तैमूरलंग ! दिल्लीवर १३९८ मधे स्वारी केली तेंव्हा त्याच्याजवळ एक लाख युध्द्कैदी होते आणि ते त्याचे गुलाम म्हणून राबण्यास तयार होते. पण , आपण दिल्लीच्या स्वारीत गुंतल्यावर ते बंड करतील या केवळ संशयाने त्याने त्या सर्वांचे शिरच्छेद केले !

माझ्या मूळ लेखात तुर्क लोकांची संपूर्ण वंशावळ मी दिली आहे पण या इथे ती प्रसिध्द केल्यावर नीट दिसत नाहे असे दुसर्‍या एका लेखाच्या वेळी ध्यानात आल्यामुळे ती इथे देत नाहिये. तूर्त आपण खुर्र्म ऊर्फ शाहजहानच्या अपत्यांपासून सुरुवात करू , शाहजहानला इराणी सरदार ऐतेमाद उद्दौला ऊर्फ घियास बेग याचा मुलगा आसफखान याची कन्या मुमताझ महल पासून एकूण १४ अपत्ये झाली ती पुढीलप्रमाणे :

१. मेहेरुन्निसा - ज. १६१३
२. जहाँ आरा - ०२-०४-१६१४ ते १६८१
३. दारा शुकोह - २०-०३-१६१५ ते ३०-०८-१६५९
४. शहा शुजा - २६-०६-१६१६ ते १४-०२-१६५८
५. रोशन आरा - ०३-०९-१६१७ ते ११-०९-१६७१
६. औरंगझेब - २४-१०१६१८ ते २०-०२-१७०७
७. उमेदबक्ष - १८-१२-१६१९ ते १६२१
८. सुरैय्याबानू - १६२१ ते १६२८
९. मुलगा - १६२२ - नामकरणापूर्वीच मृत्यु
१०. मुरादबक्ष - २८-०९-१६२४ ते ०४-१२-१६६१
११. लुत्फुल्ला - ०४-११-१६२६ ते मृत्यु दिनांक अज्ञात
१२. दौलतअब्जा - ०८-०५-१६२८ ते १६२९
१३. मुलगी - २३-०४-१६३० - जन्मतःच मृत्यु
१४. गौहर आरा - १७-०६-१६३१ ते १७०६

गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात दोहद येथे २४-ऑक्टोबर १६1८ रोजी जन्मलेला औरंगझेब याने जवळजवळ ५० वर्षे राज्य केलं पण अफाट वैभव , अमर्याद सत्ता असूनसुध्दा आपल्या हेकेखोर , जुलमी आणि संशयी वृत्तीमुळे , ज्या मराठ्यांना संपवायचे स्वप्न उराशी बाळगून तो दख्खनमधे उतरला , त्या दख्खनमधेच नगर येथे - म्हणजेच परमुलुखात त्याला मरण आलं !

या औरंगझेबच्या स्वभावाची आपण ओळख करून घेऊया :

१. लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती.अरबी , फारसी, हिंदुस्थानी आणि तुर्की
भाषेवर प्रभुत्व ! अक्षर सुंदर व वळणदार ! कुरान आणि हादीस तोंडपाठ !

२. धैर्यशाली , धाडसी व साहसी ! याचं एक उत्तम उदाहरण : २८ मे १६३३ - शहाजहानने हत्तींची झुंज लावली होते.ती पहायला औरंगझेब आपले ३ भाऊ दारा, शुजा व मुराद यांच्यासोबत आला होता.झुंज पाहता पाहता तो भान हरपून हत्तींच्या अगदी जवळ आला.तेव्हढ्यात एक हत्ती पिसाळला आणि औरंगझेबवर चाल करून आला.पण औरंगझेब मात्र तिठं ठामपणे उभा राहिला आणि त्याने चालून आलेल्या सुधाकर नावाच्या त्या हत्तीच्या गंडस्थळांत भाला फेकून मारला.तो वार सहन करूनही हत्ती तसाच पुढे आला आणि एका धडकेत त्यानं घोड्यासहीत औरंगझेबला खाली पाडलं.औरंगझेब पुन्हा उठून उभा राहिला.हत्ती इतका जवळ आला होता की , तेव्हढ्या लवकर त्याच्या बचावासाठी कुणीही येणं शक्यच नव्हतं ! कमरेची तलवार खेचून औरंगझेब अंतिम मुकाबल्यासाठी सज्ज झाला.तेव्हढ्यात आपला घोडा फेकत शुजा आला व त्यानं आपल्या भाल्यानं हत्तीला जखमी केलं.राजा जयसिंगानं आपल्या पथकासह धाव घेऊन औरंगझेबला संर्क्षण दिलं.दारूवाल्यांनी चर्कीस ची काही दारू वापरून स्फोट घडवून आणले.यामुळे व आलेल्या बाकी भालाईत लोकांच्या हल्ल्यामुळे सुधाकर घाबरून मागे वळला.ट्यावेळी चिंतातूर बादशहाने लाख मोहोरांचे बक्षिस देऊन त्याची कानौघडणी केली.यावर गुस्ताख औरंगझेब म्हणाला,"हत्तीसारख्या बलाढ्य जनावराशी लढताना मौत आली असती तरी त्यात नाचक्की कोणती होती?मोठमोठ्या शहा सुलतानांच्या आयुष्यावर मृत्यू अचानक पडदा टाकतो.मृत्यूत नाचक्की कसली?त्यात लांज वाटायचं काय कारण?लाज तर त्यांना वाटायला पाहिजे जे अशा प्रसंगी बहादुरी न दाखवतां बुझदिलीनं वागले !" या त्याच्या बोलण्याचा रोख दारा शुकोहवर होता , पण दारा तेंव्हा खरंच खूप दूर होता. हा त्याचा जळका , मत्सरी स्वभाव त्याच्या धाडसाबरोबर मरेपर्यंत कायम होता.

३. औरंगझेब भयंकर क्रूर होता.सत्नामी , शियापंथी, बोहरी , जाट , शीख व मूर्तीभंजनाच्या आड येणारे हिंदू - यांच्या त्याने क्रूर कत्तली केल्या.जून १६८९ मधे विजापूरच्या तुरुंगातील युध्दकैदी म्हणून असलेल्या १०० मराठ्यांपैकी हिंदुराव , बहिर्जी वगैरे पळून गेले म्हणून राहिलेल्या ८० लोकांची त्याने मुंडकी उडवली.आणि हे सर्व केंव्हा , तर "शरण आलेल्या शेकडो मुसलमानांना मराठे खंडणी घेऊन सोडून देत होते" ही पहात असताना !

४. छत्रपती संभाजी सारख्या तख्तनशीन राजाचा अपमानीत अवस्थेत हाल करून वध केला.या प्रकरणात त्याने दाखविलेली हीन अभिरूची केवळ तैमूरलंगालाच शोभणारी होती !

५. औरंगझेबाचा एक वकील इराणचा शहा अब्बास यांजकडे मोठा नजराण घेऊन गेला असतां , शहाने त्याचा अपमान केला , त्याची दाढीही जाळली आणि औरंगझेबाला शिव्या दिल्या व त्याची कुचेष्टा करणारे एक पत्रही त्याच्याजवळ दिले ! औरंगझेबाच्या शियाविरोधी कारवायांमुळे हा प्रसंग उद्भवला.हे हकीकत त्या वकिलाने येवून १६६६ मधे औरंगझेबला सांगितली , परंतु औरंगझेबाची आत्मनिर्भरता एव्हढी भयंकर होती की त्याने त्या वकिलाबध्दल सहानुभूती तर दाखवली नाहीच उलट "तू तेथीच त्याचा खून का केला नाहीस?" असे म्हणून त्या वकिलास सर्पदंश करवून ठार मारले !

६. रमझानचे रोझे चालू असताना औरंगझेबने आग्रा किल्ल्याला वेढा घातला.नंतर खिज्री दरवाजाच्या बाजुनं यमुनेचं पाणी आंत जात असे ते अडवलं.शहाजहानने औरंगझेबला पत्रातून लिहिले,"माझ्या गाझी पुत्रा , झाडाचं पानही खुदाच्या इच्छेशिवाय हलत नाही.पिकल्या पानाला गळून पडण्यासाठी सुध्दा खुदाची इजाजत घ्यावी लागते.नशिबाचा हा क्रूर खेळ त्याच्या मर्जीनेच चालला आहे कांय?कालपर्यंत नऊ लाख सेवकांचा पोशिंदा असलेला हा बादशहा आज थेंबभर पाण्याला महाग झाला आहे.आम्ही ज्यांना काफेर म्हणतो , ते या देशातले हिंदू खरंच धन्य आहेत, जे मेलेल्या माणसाच्याही तोंडात पाणी घालतात आणि आमचा फर्जंद दो स्व्तःला सच्चा मुसलमान म्हणवतो, रमझानच्या महिम्यात पित्याला पाण्यापासून वंचित करतो !
कीर्तीशाली पुत्रा, या फसव्या जगाचा अहंकार धरू नकोस.बुध्दी आणि विचारांचा अहंकार बाळग.हे नाशवंत जग म्हणजे एका निनावी काळोख्या खंडाकडे जाणारा अरूंद मार्ग आहे.शाश्वत सूख आणि वैभव हवं असेल खुदावर ईमान ठेव, मनुष्यमात्रांवर दया दाखव."
पित्यानं कळकळीनं लिहिलेल्या पत्राचं उत्तर औरंगझेबाने एका वाक्यात दिलं : "हे सर्व तुमच्या कुकर्मांचं फळ आहे , तुमचं तुम्ही भोगा !"
यानंतर शरण आलेल्या शहाजहानला औरंगझेबाने कैदेत टाकले-८ जून १६५८.नंतर त्याचे खूप हाल केले व २२ जानेवारी १६६६ ल तो कैदेतच मरण पावला.

७. तत्पूर्वी औरंगझेबनं मुराद आणि शुजाला ठार केलं होतंच.दारा शुकोह व त्याचा १४ वर्षांचा मुलगा सिपिहर शुकोह यांना एका चिखलानं भरलेल्या छोट्या हत्तीणीच्या छत नसलेल्या हौद्यात बसवून रणरणत्या उन्हात दिल्लीतून धिंड काढली.खवासपुर्‍यातल्या जनतेला प्रचंड कणव होती.त्या रीत्री दिल्लीत फाका सुरू झाला, चुली पेटल्या नाहीत !
तुरुंगातून दारानं एक करून व हृदयस्पर्शी पत्र आपल्या दावेदार व शत्रु असलेल्या औरंगझेबला लिहिलं : "हमारे छोटे बिरादर और बादशहा आलम् गीर , राज्य मिळवण्याची इच्छा आता आम्हाला राहिलेली नाही.ही बादशाहत तुम्हांला आणि तुमच्या वारसांना मुबारक ठरो.तुम्ही आम्हाला ठार मारायचं ठरवलेलं आहे.पण हा विचार तुमच्या विचारी मनाला शोभणारा नाही.ही हत्या अनावश्यक आहे.एखादं मकान आणि एक नोकर तुम्ही दिलात तर यापुढचं आयुष्य आम्ही खुदाची याद करत घालवू.आमची निंदा करण्यासाठी तुम्ही आम्हांला काफीर करार दिलांत.आम्हाला त्याचा बिल्कुल राग येत नाही.तुम्ही म्हणतां ते खरंच आहे.या क्षणी आम्ही अशा अवस्थेत आहोत की, निंदा आणि स्तुतीत कसलाही भेद आम्हांस दिसत नाही.खुदा तुम्हाला सलामत ठेवो !"
यावर औरंगझेबाचण दाराला २ ओळींचं उत्तर गेलं : "यापूर्वीही तू हुकूम उदुली केली होतीस.त्याहीवेळी तू राजद्रोह्यांपैकी एक होतांस !"
यानंतर कुली बेग याने ऐरंगझेबच्या सांगण्यावरून दाराला "हलाल" करून ठार मारले.दाराचे कापलेले मुंडके औरंगझेबाकडे पाठविले.औरंगझेबाने , रक्ताने माखलेला तो चेहेरा नीट ओळखता यावा म्हणून ते मुंडके धुवून आणायला सांगितले.ते मुंडके दाराचेच आहे याची खात्री पटल्यावर दाराचे अर्धवट मिटलेले नेत्र गुलामांकडून त्याने पूर्ण उघडायला लावले.आपल्या तलवारीच्या टोकानं मस्तकाला स्पर्श करत तो उद्गारला, "अय् बदबख्त ! तुझे मारकर आज हम यकीनन् गाझी हो गए ! तू जिवंत होतास तेंव्हा तुझं तोंडही पहाण्याची अमची इच्छा नव्हती.आज तुझं तुटलेलं मस्तकही पहाण्याची आमची इच्छा नाही."
यावर तो थांबला नाही."मरणान्तराणी वैराणी" ही उक्ती माणसांसाठी असते ना ! त्याला दाराच्या धडाचीही विटंबना करायची होती.त्यासाठी त्याने दाराच्या धडाची धिंड काढायचे ठरवले.हत्तीच्या पाठीवर दारा शुकोहचं धड उलटं लटकावत ठेवलं.नक्कारे वाजवून कोतवालीचे शिपाई लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेवू लागले.
हत्ती चालू लागला.
तुटलेल्या मानेतून काळपट रक्ताची धार रस्त्यावर सांडू लागली.उंच बांबूवर खोचलेलं दाराचं शीर नाचवत चेले पुढे निघाले.लोक ते दॄष्य बघून दु:खाने काळवंडले.अनेकांची वाचा बसली.दारा मेला याबध्दल लोकांची खात्री पटावी यासाठी ही धिंड काढण्यात आली.आदल्याच दिवशी म्हणजे बुधवारी जिवंतपणी आणि मेल्यावर गुरुवारी आपल्या सख्ख्या थोरल्या भावाची विटंबना करणारा औरंगझेब लोकांना सैतान वाटला.शहरभर फिरुन धिंड पुन्हा सकाळच्या दोन प्रहरी खवासपुर्‍यांत आली.दाराचं शीर आणि कबंध खवासपुर्‍यांत आणून जोडण्यात आलं.नंतर ते शहाजहानकडे पाठविण्यात आलं.पेटीत आवडत्या दाराचं प्रेत पाहिल्यावर शहाजहान बेशुध्दच पडला.जहाँ आरानं ते प्रेत पाहिल्यावर तिनेही मोठी किंकाळी फोडली.नंतर दाराचं शव हुमयूनच्या कबरीच्या आवारात पुरण्यात आलं !गुस्ल नाही , दुवा नाही, दोन आण्याचं कफनही प्रेताला लाभलं नाही !फातेहा न पढताच मुर्दा खड्ड्यात लोटण्यात आला व मातीनं बुझवण्यात आला.दाराचा मुलगा सुलेमान याला ग्वाल्हेरच्या तुरुंगात टाकून अफू मिसळलेलं पोस्ता हे पेय देऊन मे १६६२ मधे त्याचा वध करण्यात आला.
दाराच्या मृत्यूच्या आधी तो पकडला जाण्यापूर्वी , देशोधडीला लागलेल्या दाराच्या बायकोचा नादिरा बेगमचा बोलन खिंडीच्या आधी दाधरच्या अलिकडे दोन कोसांवर ६ जून १६५९ रोजी अंत झाला.मलीक जीवनच्या मदतीने शव लाहोरला पाठवलं गेलं.दाराच्या पश्चात् दाराची एक बेगम जुलेखा उदेपुरी जी जॉर्जीयन होती तिला औरंगझेबने आपल्या जनानखान्यांत ओढली.दाराची तिसरी पत्नी रानादिल ही लावण्यवती होती.ती आधी नर्तकी होती.दाराच्या मृत्यूनंतर विमनस्क अवस्थेत त्याच्या कबरीवर फातेहा पढणार्‍या रानादिलच्या सौंदर्यावर औरंगझेब भाळला.त्याने जुलेखाप्रमाणेच तिलाही निकाह लावण्याची लालूच दाखवली.पण रानादिल ही दाराशी एकनिष्ठ व पतिव्रता होती.तिने उलट निरोप पाठवला,"माझ्ह्यातलं तुला काय आवडलंय?"यावर औरंगझेबनं कळविलं,"मला तुझा सुंदर केशकलांप आवडलाय!"तेंव्हा तिने आपले सगळे केस कापून त्याच्याकडे पाठविले आणि कळविलं,"तुला हवं आहे ते घे !"एव्हढ्यानेही औरंगझेब शहाणा झाला नाही.त्याने तिला सविस्तर कळविलं की ,"मला तुझ्याशी निकाह लावायचांय्.तुला काही कमी पडणार नाही.मला दारा समजून तू माझी पत्नी हो !तुझ्या चेहेर्‍याचं सौंदर्य अपूर्व आहे , ते मला हवंय्.तू माझी हो !"
यावर त्या चारित्र्यसम्पन्न रानादिलने आप्ल्या महालात जाऊन सुरीनं सपासप आपल्या चेहेर्‍यावर जखमा करून घेतल्या.भळाभळा वाहणारं रक्त जमा करून औरंगझेबाकडे पाठवून तिने त्याला कळविलं , "तुला माझं सुंदर मुखकमल हवय, पण त्याची आता वाट लागलीय !"
एव्हढं झाल्यावर मूर्ख औरंगझेब शांत झाला !
पुढचं सारं आयुष्य दाराच्या आठवणींवर रानादिल संन्यासिनी प्रमाणे जगली !

८. आपला भाऊ दाराबाबत दाखविलेले हिडेस्स क्रौर्य त्याने परत छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत व कवी कलश यांच्या बाबत पण दाखविले.आपली मुलगी झेबुन्निसा हिला पण त्याने तुरुंगात टाकून तिचे हाल हाल केले.त्याच्याकडून कैद व्हायचा त्याचा मुलगा अकबर एकटा वाचला पण त्यालाहे परागंदा व्हावे लागले व अखेर तो निर्वासित अवस्थेत इराणमधे मरण पावला !
झेबुन्निसा नावाप्रमाणेच "लावण्यलतिका" होती.ती फारच हुषार व चुणचुणीत होती.अल्पवयात सबंध कुराण पाठ करून तिने ३० हजार मोहोरा बापाकडून मिळवल्या होत्या.ती बापाची सर्वांत लाडकी होती पण 'अकबराच्या आपल्याविरुध्दच्या बंडात तिची सहानुभूती अहे' असे समजताच औरंगझेबने तिला कैदेत टाकले , काही वर्षांनी ती कैदेतच मरण पावली.

९. राजा जयसिंग याने दाराशी केलेल्या नमकहरामीमुळे औरंगझेबला बादशाही मिळाली.पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून गेल्यावर त्याला जयसिंग मिर्झाचा संशय आला व त्याने त्यालाही कपटाने विषारी चिलखत वापरावयांस देवून ठार मारले !

१०. वर्षानुवर्षे मोगलांशी ईमान बाळगणार्‍या राजपुतांवर त्यने १६७९ पासून राज्य खालसा करण्यासाठी युध्द सुरु केले.

११. १६६९ मधे औरंगझेबने काशीचे विश्वेश्वराचे देऊळ व ज्याच्या बांधकामाला त्याचा मोठा भाऊ दारा याने मदत केली होती ते मथुरेचे केशव मंदिर त्याने पाडले.या देवळे पाडण्याच्या मोहिमेत ज्या हिंदूंनी विरोध केला, त्यांच्या सरसकट कत्तली केल्या.नंतर त्याने जेजूरीच्या खंडोबाचे व पंढरपूरच्या विठोबाचे देऊळ पण तोडले.

१२. आयुष्यभर त्याने हिंदूंना बाटवून मुसलमान बनविण्यावर भर दिला.मुसलमानांत सुध्दा शिया व सुन्नी असा भेदभाव केला.तुर्क / मोंगल मुसलमानांना तो हिंदुस्थानी मउसलमानांपेक्षा श्रेष्ठ समजत असे.सर्व हिंदूंवर त्याने "जिझिया" कर बसवला.

अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !

कारणे काहीही असोत् , मरणोत्तर त्याने मायमराठीच्या मनावर सत्ता गाजविणार्‍या "लोकसत्ता"मधे प्रथम पॄष्ठावर स्व्तःच्या कबरीच्या छायाचित्रासह झळकून छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांवर निस्सीम प्रेम आणि श्रध्दा बाळगणार्‍या तमाम मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अढळपद मिळवलंय ! आजच्या २१ व्या शतकांतील ओसामा बिन् लदेन् व सद्दाम हुसैन यांसारख्या जुलूमशहांना व अतिरेक्यांना लाजविणार्‍या अशा या १७ व्या व १८ व्या शतकातील क्रूर , कपटी , नीच व कृतघ्न औरंगझेबाला "या फेब्रुवारीत मरून ३०० वर्षे पूर्ण होणार!" म्हणून मानाचे स्थान देणार्‍या नगरच्या श्री.भूषण देशमुख व लोकसत्ता यांचे कौतुक करायला गेले दोन आठवडे मी शब्द शोधतोंय , पण ते शब्द कुठेतरी रायगडच्या समाधीखाली आणि वढू बुद्रुकच्या समाधीखाली इतके रुतून बसलेत की ते काढताना माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबतच नहियेत !

अरे लांगुल्चालनच करायचे असेल तुम्हाला तर , आमचे राष्ट्रपती व महान संशोधक ए.पी.जे.अब्दुल कलाम किंवा मदारी मेहेतर यांचे करा ना ! या अश्या प्रभृतींबाबत मनांत "धर्म" हा शब्दसुध्दा येत नसेल कुठल्याच हिंदुस्थानी माणसाच्या मनांत !
शेवटी इतकंच म्हणेन :

निंदकाचे घर असावे शेजारी
कपट्यांची मझार असावी "बाजारी"
तिथे जो फुले ठेवून लावेल हजेरी,
तोच गाजवील "लोकसत्ता", बाकी सर्व आजारी !

बा.भ.बोरकर म्हणाले होते,

दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,
तेथे कर माझे जुळती !

आणि आजची ही परिस्थिती पाहून वाटते,

चबुतर्‍यांची जेथ प्रचिती
तेथे "मिंधे" कर जुळती !

कुठेतरी बा.भं,चा आत्मा तळतळला असेलच ना?

कुमार केतकर "मराठी" आहेत असे म्हणायची लाज वाटते आम्हास!

अशा या नरभक्षक , कपटी , कृतघ्न , धर्मांध आणि संशयाचा महामेरूमणी असलेल्या औरंगझेबचा मॄत्यु२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगरला झाला.जसा १४ फेब्रुवारी हा व्हॅलेन्टाईन डे म्हणून साजरा करतात तसा, माझ्या मते २० फेब्रुवारी हा दिवस जगात नाहे तर किमान पक्षी हिंदुस्थानात तरी "माणुसकीचा नवा जन्मदिवस " म्हणून साजरा करायला हवा.याबाबत समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळी फारच समर्पक वाटतात :

बुडाला औरंग्या पापी
म्लेंच्छ सम्हार जाहला
मोडिली मांडिली क्षेत्रे
आनंदवनभुवनी !

------------------उदय गंगाधर सप्रे - ठाणे - २१-जानेवारी-२००७.-----------------------------

Faviconमैत्री म्हणजे कांय? 20 Apr 2008, 10:54 pm

मैत्री म्हणजे कांय?

समज तुला तहान लागली आहे.

समोर पाणी नाहिये , यावेळी मीही तुझ्यासोबत नाहिये.

अशा वेळी समजा तुझी तहान शमलीच , तर खुशाल समज की , मला तुझ्या घशाची कोरड जाणवली आहे आणि ती

मी माझ्याकडे ओढून घेतली आहे !

मैत्री म्हणजे कुणीतरी , कुणाची तरी ,

ओढून घेतलेली तहान आहे.

ते नातंच इतकं महान आहे , की ,

त्याला मैत्री हे शिर्षक खूपच लहान आहे !

मैत्री म्हणजे मला जाणवलेला

तुझ्या घशाचा कोरडा आहे !

ज्याला हे समजलं तो शांत आहे ,

इतरांचा मात्र मैत्रीच्या नावाने ओरडा आहे !

Faviconकोंढाणा 17 Apr 2008, 1:32 am

()

Faviconशिवरायांचे "८" वावे रूप 9 Apr 2008, 2:12 am



रसिक वाचकही , "सप्रे"म नमस्कार !
या लेखाचं शिर्षक वाचून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटले असेल्.काहींच्या मनात असंही आलं असेल की आजच्या या संगणक युगात ई-मेल मधे लिहितात तसंच हे पण काही शॉर्ट कट वगैरे आहे की काय?
पण माझ्यासारख्या तमाम शिवभक्तांना मी अत्यंत विनम्रपणे हे सांगू इच्छितो की "या शिर्षकात वापरलेला"८" ह्या आकड्याला शिवरायांच्या कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्व आहे" हे कळावे म्हणूनच हा एव्हढा ऊहापोह ! मी स्वतः एक अभियंता असल्यामुळे कदाचित मला हे "अंकशास्त्र" भावले आहे आणि लेख वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा निवाळ योगायोग नव्हे !

लेख सुरु करण्यापूर्वी "गुणांक" महणजे काय हे समजावून घेवूया कारण यालेखात हा शब्द फार वेळा येणार आहे.

समजा एखाद्या माणसाचा जन्मदिनांक २१-मार्च-१९८५ आहे तर त्याच्या जन्मतारखेचा गुणांक काढण्यासाठी आपण सगळ्या आकड्यांची "एक" अंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करायची - जसे यात २१-०३-१९८५=२+१+३+१+९+८+५=२९=२+९=११=१+१ =२, म्हणजे गुणांक "२"

तर आता आपण मूळ लेखाकडे वळुया.या लेखाचे "८" महत्वाचे "योगायोग" आहेत ते क्रमशः असे :

१. शिवरायांना "८" बायका होत्या :
१. सईबाई निंबाळकर
२. सगुणाबाई शिर्के
३. सोयराबाई मोहिते
४. लक्ष्मीबाई विचारे
५. सकवारबाई गायकवाड
६. काशीबाई जाधव
७. पुतळाबाई मोहिते
८. गुणवंताबाई इंगळे

२. शिवरायांना "८" अपत्ये होती ती पुढीलप्रमाणे :

माता अपत्याचे नांव अपत्याच्या नवरा / बायको चे नांव
सईबाई १. सखुबाई ऊर्फ सकवारबाई - महादजी निंबाळकर
२. राणुबाई ऊर्फ राणूअक्का जाधव
३. अंबिकाबाई हरजीराजे महाडिक
४. संभाजी येसुबाई, दुर्गाबाई, चंपाबाई (कछवाह घराणे)
सोयराबाई ५. दीपाबाई विसाजीराव
६. राजाराम जानकीबाई,ताराबाई,राजसबाई,अंबिकाबाई
सगुणाबाई ७. नानीबाई ऊर्फ राजकुंवर गणोजी शिर्के
सकवारबाई ८. कमलाबाई जानोजी पालकर (नेताजी पालकरांचा मुलगा)

३. शिवरायांची उंची होती ५' ८" = १७० सेंटीमीटर=१+७=८ गुणांक "८"

४. शिवरायांचा जन्म : १९-०२-१६३०=१+९+२+१+६+३ =४ जन्म गुणांक= ४
शिवरायाचा म्रुत्यु : ०३-०४-१६८०=३+४+१+६+८=४ म्रुत्यु गुणांक=४
आयुष्याचा गुणांक्=जन्म गुणांक्+म्रुत्यु गुणांक= ४+४ = "८"

५. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रोहिडेश्वरी : १५-०४-१६४५, गुणांक "८"

६. कल्याण्-भिवंडी काबीज केली : २४-१०-१६५७ , गुणांक "८"

७. सईबाईंचा म्रुत्यु : ०५-०९-१६५९ , गुणांक "८"

८. शिवरायांचा राज्याभिषेक झाला (१६७४ साल) तेंव्हा त्यांचे वय होते ४४ पूर्ण = ४+४= गुणांक "८"
शिवरायांचे वजन होते १६,००० होन= ४ मण
शिवरायांच्या सिंहासनाचे वजन होते ३२ मण , म्हणजेच शिवराय स्वतःपेक्षा त्या पवित्र सिंहासनाला ३२ /
४= "८" पटीने मान द्यायचे
राज्याभिषेकानंतर शिवरायांनी मंत्रीमंडळाची स्थापना केली : "अष्ट" प्रधान मंडळ , मंत्री "८"

म्हणूनच तर समर्थ रामदास स्वामींनी म्हटले नसेल ना?

शिवरायांचे "८" वावे रुप
शिवरायांचा "८" वा प्रताप
शिअवरायांचा "८" वावा साक्षेप
भू मंडळी !

आम्ही पण "८"वतो शिवरायांना "अष्टौ"प्रहर म्हणजे "८" प्रहर !
हा लेख मी लिहिला (बरेच दिवस मनात असूनही काल लिहिला) २६ तारखेला - गुणांक "८" , साल - एकविसाव्या शतकातील "८" वे , लेख पूर्ण केल्याची वेळ रात्री १० व. ३१ मि. म्हणजेच इंग्रजी वेळेप्रमाणे तासांच्या हिशोबात २२.३१ अवर्स = २+२+३+१= गुणांक "८"

अश्या या आमच्या आराध्य दैवताची कीर्ती दिगदिगंत "अष्ट्"दिशांना पसरत राहो ह्या सदिच्छेसह,

उदय गंगाधर सप्रे-ठाणे
Sudayan2003@yahoo.com

"शिवरायांचे "८" वा वे रूप" मधे लिहायचे राहून गेलेले ३ योगायोग

हे योगायोग असे :
१. शिवरायांची राजमुद्रा "अष्टकोनी" होती.
२. राजमुद्रेवरील एकूण अक्षरी ३२ - आणि ती ८-८ च्या पटीतच म्हणतात - बघा : प्रतिपश्चंद्र लेखैव , वर्धिष्णूर्विश्ववंदिता,शाहसुतो* शिवस्यैषा , मुद्रा भद्राय राजते
* सगळीकडे शाहसुनो असे लिहिले जाते ते अयोग्य आहे असे वाटते कारण शहाजी राजे हे संसकृत चे उत्तम जाणकार होते त्यामुळे त्यांनी लिहून देताना शाहसुतो (म्हणजे शहाजीचा पुत्र - सुत म्हणजे पुत्र) असेच लिहून दिले असणार पण मुद्रा ङ्हडविणारे लोक हे काही शहाजी राजांएव्हढे सुशिक्षित नसावेत किंवा त्याकाळी मुद्रेवर एकदम सफाईदार अक्षरे कोरण्याएव्हढे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते.
३. शिवरायांची राजकीय कारकीर्द वयाच्या १५ पासून ते ५० पर्यंत म्हणजेच ३५ वर्षे होती - ३+५= गुणांक "८"

४. शिवराय आग्र्याच्या कैदेतून निसटले : १७-ऑगस्ट-१६६६ : गुणांक "८"
५. शिवरायांची राज्याभिषेकाच्या आधी त्यावेळी हयात असलेल्या ६ राणुआंशी परत लग्ने लावली गेली वैदिक पध्द्तीने : ३०-मे-१६७४ : गुणांक "८"

अनावधानाने हे लिहयला विसरलो , क्षमस्व !

उदय "सप्रे"म

()

Faviconशंभवे नमः 8 Apr 2008, 2:05 am


()

Faviconमावळ्यांचे मनोगत 8 Apr 2008, 2:03 am


()

Faviconगुढी पाडवा - शुभेच्छा - ३ 8 Apr 2008, 2:01 am


()

Faviconगुढी पाडवा - शुभेच्छा - २ 8 Apr 2008, 2:00 am


()

Faviconगुढी पाडवा - शुभेच्छा - १ 8 Apr 2008, 1:58 am


()

Faviconमदन मोहन 8 Apr 2008, 1:57 am


()

Faviconही पण "श्रीं" ची च इच्छा ! 7 Apr 2008, 11:07 pm



रसिक वाचक,"सप्रे"म नमस्कार ! आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३२८ वी पुण्यतिथी ! या निमित्ताने , माझ्या आगामी "झंझावात" या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे."माणसात पण देवत्वाचा अंश असतो" हे ग.दि.मां ई आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे :
ज्ञानियांचा वा तुक्याचा
तोच माझा वंश आहे,
माझिया रक्तात थोडा
ईश्वराचा अंश आहे !
आजच्या या रसातळाला चाललेल्या "आरक्षण" रूपी आमिषांनी आपली तुंबडी भरणार्‍या राजकारणी जमान्यात , शिवराय , तुमची खूप कमतरता भासते !
तुमच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन !
जीवाशी खेळताना प्रत्येक क्षणी,
मातृभूमीसाठी लावताना बाजी
नसांनसांत दौडत जाते -
ती वृत्तीम्हणजेच छत्रपती शिवाजी !--------------------------------------------

माझ्या माव